मांद्रे पोलिसांना निवेदन सादर; जमीन वादातून खून झाल्याचा संशय व्यक्त मोरजी वरचा वाडा येथील उमाकांत खोत यांच्या जमीन वादातून झालेल्या खुनप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुळमुंडकर संघर्ष समितीने केली आहे. समितीच्या प्रतिनिधींनी मांद्रे पोलिस स्थानकाला निवेदन सादर करून या प्रकरणात गुन्हेगारांना तातडीने अटक करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली. या घटनेबद्दल स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
Categories
Crime
Saved! I know I’ll be coming back to this.