काँग्रेस-आपने हस्तक्षेप अर्ज न केल्याची खंत; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्न फोंडा पोटनिवडणुकीत झालेल्या घडामोडींवर एमजीपी नेते दीपक धवळीकर यांनी गंभीर त्रुटींचा मुद्दा उपस्थित केला आहे. भाजप, काँग्रेस आणि आप या तिन्ही पक्षांचा सहभाग असताना याचिका आधीच दाखल झाली होती, मात्र आदेश राखून ठेवण्यात आल्यानंतर काँग्रेस आणि आपने हस्तक्षेप अर्ज दाखल केला नाही, ही मोठी चूक ठरल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच आयोगाने या प्रकरणाची दखल घ्यायला हवी होती, असेही त्यांनी नमूद केले. सध्याची परिस्थिती दुर्दैवी असल्याचे सांगत, हा विषय उच्च स्तरावर नेऊन सखोल चर्चा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी निवडणूक आयोग आणि राजकीय पक्षांनी जबाबदारी स्वीकारावी, असेही धवळीकर म्हणाले.
Categories
Political
फोंडा पोटनिवडणुकीत त्रुटींवर दीपक धवळीकर यांचा सवाल

