Categories Civic Issues

राजीव गांधी कला मंदिरात ‘बत्ती गुल’! सन्मान समारंभ अंधारात

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कार्यक्रम वीज गेल्यामुळे अर्धवट; सुमारे ३० मिनिटे जनरेटरही बंद राजीव गांधी कला मंदिरात फोंडा मतदारसंघातील १०वी आणि १२वी गोवा बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी आयोजित कार्यक्रमाला अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने मोठा धक्का बसला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले नामवंत नेतृत्व सल्लागार आणि प्रेरणादायी वक्ते डॉ. जी. सुब्रमणियन यांचे भाषण सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच वीज गेली आणि संपूर्ण सभागृह अंधारात बुडाले.सुमारे ३० मिनिटांपर्यंत वीजपुरवठा बंदच राहिला आणि यावेळी कोणताही बॅकअप सुरू न झाल्याने उपस्थित विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले. एकीकडे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी आयोजिलेला कार्यक्रम प्रेरणादायी ठरावा अशी अपेक्षा होती, तर दुसरीकडे अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे हा कार्यक्रम विस्कळीत झाला.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *