“लोकशाहीला धोका”; निवडणूक ZP निवडणुकांसोबत का घेतली नाही? सरकारवर सवाल फोंडा पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर काँग्रेस उमेदवार केतन भाटीकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे म्हणत, पोटनिवडणूक ZP निवडणुकांसोबत का घेतली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाटीकर यांनी दावा केला की, पक्षाला याबाबत १५ दिवस आधीच माहिती होती, मात्र सरकारने योग्य वेळी कारवाई केली नाही. याचिकाकर्त्यांचे भाजपशी संबंध असल्याचा आरोप करत त्यांनी अॅडव्होकेट जनरलच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुख्यमंत्री आता “फोंड्याचेच मुख्यमंत्री” झाले आहेत, असा टोला लगावत २०२७ पर्यंत त्यांच्या प्रत्येक भेटीवर लक्ष ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Categories
Political
फोंडा पोटनिवडणूक रद्दीकरणावर केतन भाटीकरांचा हल्लाबोल

