Categories Civic Issues

परीक्षेला बसू न दिल्याच्या कारणास्तव विद्यार्थिनीचा मृत्यू

निकालाबाबतच्या भीतीपोटी कॉलेजने परवानगी नाकारल्याचा पालकांचा आरोप; कागदपत्रांवर सही करण्यासाठी दबाव टाकल्याचेही दावे बायणा येथील १९ वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची गंभीर घटना उघडकीस आली असून, बारावीच्या बोर्ड परीक्षेला बसण्यास कॉलेज प्रशासनाने नकार दिल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचा आरोप पालकांनी केला आहे पालकांच्या म्हणण्यानुसार, परीक्षेतील निकाल खराब जाईल या भीतीने कॉलेजने तिला परीक्षेला बसू दिले नाही तसेच काही कागदपत्रांवर सही करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. या घटनांनंतर सदर विद्यार्थी नैराश्यात गेल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे . प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *